Friday, 13 February 2015

ऐतिहासिक पार्श्वभूमी




नाशिक शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून नाशिक जिल्ह्याकडे पाहिले जाते.सर्वच क्षेत्रात आघाडीवर नाशिक जील्ह्याकडे बघितले जाते.मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामर्गापासून जवळच एक महत्वाचे श्रद्धास्थान म्हणून, शिर्डीसारख्या क्षेत्राचे सान्निध्य,तीर्थक्षेत्र म्हणून परिचित असलेले नाशिक-त्र्यंबकचे महात्म्य यामुळे वर्षभर येथे भाविकांची तसेच पर्यटकांची वर्दळ नेहमीच आपल्या दिसेल.या ठिकाणचे हवामान हे आरोग्यास उत्तम प्रतीचे आहे.पर्यटक या ठिकाणी हवापालटीसाठी नाशिकला राहायला येत असतात.


    
नाशिक शहर गोदावरी नदी काठी वसलेले असून, या ठिकाणी पेशव्यांची सत्ता होती त्यावेळेस त्यांनी नाशिक शहरात घात,मंदिरे उभारून नाशिक शहराला आकार देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.त्यात पेशव्यांच्या सरदारांनी बांधलेले श्रीकाळाराम मंदिर हे जगप्रसिद्ध आहे तसेच नुकतेच पी.के. चित्रपटाचे चित्रीकरण याठिकाणी झाले.तसेच याच मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा, या मागणीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक सत्याग्रह केला होता. पंचवटी परिसरात नारोशंकर मंदिर, कपालेश्वर मंदिर,तपोवन, नाशिक रोड येथे मुक्तिधाम हि स्थळे आहेत. तसेच दर बारा वर्षांनी रामकुंडावर सिंहस्थ महाकुंभमेळा या ठिकाणी भरतो.
    शहरा जवळच आनंदवल्ली हे ठिकाण आहे.या गावचे मूळ नाव चावड. या गावात राघोबादादांनी त्यांची पत्नी आनंदीबाई हिच्यासाठी राजवाडा बांधला होता.तसेच यागावचे नावहि आनंदवल्ली ठेवले.




नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर अंजनेरी हे गाव आहे. हे गाव इतिहासप्रसिद्ध तर आहेच, परंतु हनुमानाचा जन्म या अंजनेरीच्या डोंगरावर झाल्याची आख्यायिका असल्याने येथे हनुमान जयंतीला मोठी यात्रा भरते. इ.स.७२० मधील दोन ताम्रपट व तेराव्या शतकातील दोन ताम्रपट या गावात सापडल्याने या गावाचे महत्व अधिकच स्पष्ट झाले. त्याकाळची राजधानी म्हणून अंजनेरी हे होते.

नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य आभियांत्रिकी व संशोधन संस्था, महाराष्ट्र पोलीस अकादमी आहे. एकलहरे या ठिकाणी औष्णिक  विद्युत केंद्र आहे,तर भगूर हे गाव स्वांतत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. 

त्र्यंबकेश्वर हे ठिकाण नाशिक शहरापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. याच परिसरात कुशावर्त तीर्थ असून, येथेही बारा वर्षांनी नाशिकबरोबरच शैव पंथीय साधू-महंताचा कुंभमेळा भरतो. येथे असलेल्या ब्रह्मगिरी डोंगरातून गोदावरीचा उगम झालाय. याच गावात निवृत्तीनाथांनी समाधी घेतली असून, दरवर्षी येथे मोठी यात्रा भरते.




चांदवड हे तालुक्याचे ठिकाण असून, येथे लोकमता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे निवासस्थान होते. येथे ११व्या शतकातील जैन लेणी आहेत. होळकरांचा भव्य वाडा आणि वाड्यातील रंगीत चित्रे पाहाण्यासारखी आहेत. चांदवडमधील रेणुकादेवीचे मंदिर प्रसिध्द आहे.

कळवण तालुक्यातील सप्तशृंग गडावरील सप्तशृंगी निवासिनीचे मंदिर आहे. देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक म्हणून हे स्थान प्रसिध्द आहे इगतपुरी येथील विपश्यना केंद्र प्रसिध्द आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणूनही हे प्रसिध्द आहे.
नाशिक शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून नाशिक जिल्ह्याकडे पाहिले जाते.सर्वच क्षेत्रात आघाडीवर नाशिक जील्ह्याकडे बघितले जाते.मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामर्गापासून जवळच एक महत्वाचे श्रद्धास्थान म्हणून, शिर्डीसारख्या क्षेत्राचे सान्निध्य,तीर्थक्षेत्र म्हणून परिचित असलेले नाशिक-त्र्यंबकचे महात्म्य यामुळे वर्षभर येथे भाविकांची तसेच पर्यटकांची वर्दळ नेहमीच आपल्या दिसेल.या ठिकाणचे हवामान हे आरोग्यास उत्तम प्रतीचे आहे.पर्यटक या ठिकाणी हवापालटीसाठी नाशिकला राहायला येत असतात.

Wednesday, 4 February 2015

नाशिक तपोभूमी आणि कर्मभूमी


           


प्रभू श्रीरामचन्द्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे “नाशिक” १४ वर्षाच्या वनवासाच्या काळात राम,लक्ष्मण आणि सीतामाता गोदाकाठी पंचवटी पर्णकुटीमध्ये त्यांनी निवास केला होता. पृथ्वीतालावरील हिंदू धर्मियांचा सर्वाधिक पवित्र शहरात नाशिकचे सर्वोच्च स्थान आहे.कारण येथे होणारा “सिंहस्थ कुंभमेळा “ प्रत्येक बारा वर्षानंतर एकदा नाशिक य शहरात भरतो . जेंव्हा सुर्य सिंह राशीत प्रवेश करतो.


    


 

    भारतभर दशक्रियेसाठी काशी आणि नाशिकचे महत्व अहंमान्य आहे. त्र्यंबकेश्वर बारा ज्योतिर्लिंगपैकी नाशिकपासून फक्त तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे. तेथूनच उगम पावणारी गोदावरी नदी य ठिकाणी आहे.तसेच य नदीला दक्षिणगंगा या नावाने प्रसिद्ध आहे. व रामकुंड हे पवित्र तीर्थ या नदीवर आहे. येथे असलेले शंकर भगवानाचे मंदिर असून त्या मंदिरात शंकर भगवानाचे वाहन नंदी या मंदिरात नसून असे एकमेव मंदिर आपल्या भारतात म्हणजे नाशिक या शहरात आहे.

    

     एकीकडे तपोभूमीचे सामर्थ्य पाहता नाशिकचे तांत्रिकदृष्ट्या प्रगती विसरून चालणार नाही.भारतातील चलनी नोटांचा कारखाना [ नोट प्रेस ] नाशिक शहरात आहे. तसेच शहरापासून वीस किलोमीटर अंतर असलेले ओझर या ठिकाणी लढाऊ विमान कारखाना [H.A.L], तसेच भारतातील क्रमांक एक व आशिया खंडातील क्रमांक दोनचा सर्वाधिक ५.०३ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल नाशिक शहरातून जातो.

    

      जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये आपल्या नाशिक शहराचा १६वा क्रमांक लागतो. शहराची लोकसंख्या २०लखाहुन अधिक आहे. हि लोकसंख्या २७० कि.मी. अंतराच्या परिघात वसलेली आहे. शहरातून जाणारा सहापदरी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग [N.H.] क्रं.०३ आता एशियाटिक हायवे नं.४७ हि बनला आहे.  तसेच ओझर येथे विमानतळ प्रकल्प चालू आहे. गंगापूर धरणावर होणारा [fiying sea plane ] प्रकल्पाचे काम करण्याचे सरकार प्रयत्न सरकार करत आहे. अंबड,सातपूर आणि सिन्नर येथिल माळेगाव सारख्या MIDC नाशिकच्या प्रगतीत मोलाचा वाटा आहे . 

   

     भारताचे वाईन राजधानी म्हणून आपल्या नाशिकची ओळख निर्माण झाली आहे.७५ वाईनरी नाशिक शहरात आहे म्हणूनच नाशिक शहराला जगाच्या नकाशावर वेगळे स्थान निर्माण प्राप्त झाले. उत्तम प्रतीचे द्राक्ष निर्यात करणारे शहर आहे. बारमाही थंड तापमान नाशिकमध्ये आल्हादायी असते. जून महिन्यापासून डिसें-जानेवारी पर्यंत पंधराहून अधिक गडकिल्ले भटकंतीला जसे जनी खुणावतात.


   

  

 

 

    हिंदू प्रमाणेच मुस्लीम , ख्रिश्चन ,शीख  इ. धर्मांचे लोक व त्यांची संस्कृती आपल्याला य शहरात दिसून येते. हे सर्व धर्मीय एकोप्याने वावरताना दिसतात तसेच एकमेकांच्या सणावारात आनंदाने सहभागी होताना आढळतील.